लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना 'सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६' जाहीर
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित 'सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार २०२६' यावर्षी वैयक्तिक श्रेणीत भारतीय लष्कराच्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना जाहीर झाला आहे. मूळच्या अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील असलेल्या सीता शेळके यांनी २०२४ मध्ये केरळमधील वायनाड येथे झालेल्या भीषण भूस्खलनादरम्यान बचावकार्यात ऐतिहासिक कामगिरी बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराच्या इंजिनीअरिंग विंगने प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत कमी वेळात १९० फूट लांबीचा 'बेली ब्रिज' (Bailey Bridge) उभारला होता, ज्यामुळे मदतकार्याला मोठी गती मिळाली आणि शेकडो लोकांचे प्राण वाचले.
या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये आणि मानपत्र असे आहे. दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त (२३ जानेवारी - पराक्रम दिवस) या पुरस्काराची घोषणा केंद्र सरकारद्वारे केली जाते.
या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये आणि मानपत्र असे आहे. दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त (२३ जानेवारी - पराक्रम दिवस) या पुरस्काराची घोषणा केंद्र सरकारद्वारे केली जाते.