राज्यात 1700 पेक्षा जास्त तलाठी पदांची भरती; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकृत घोषणा
Published
02 Mar 2026, 10:35 AM
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्यात लवकरच 1700 पेक्षा जास्त तलाठी पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महसूल विभागातील मनुष्यबळाची कमतरता भरून निघणार असून, तरुणांना मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, तलाठी भरती प्रक्रियेबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली असून, लवकरच याबाबत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असून, पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी दिली जाईल.
Last updated on 05 May 2026, 12:15 PM